Sunday, 23 August 2020

यत्र, तत्र, सर्वत्र...

यंदाचा भरपूर पाऊस, नुकताच होऊन गेलेला पोळा आणि येऊ घातलेले गणपती. ग्रामीण भागातल्या आमच्या काही स्टाफचा बुट्टी मारायचा मोसम. त्यात आज पाण्याची मोटार बिघडली. म्हणजे पाणीच पाणी चहुकडे पण नळाचे पाणी गेले कुणीकडे ? अशी गमतीदार गत सकाळीसच झालेली. 
थोडक्यात या गोंधळात पहिली विकेट योगासनांची पडली. पाणी, ही मोटर, ती मोटर असं दोघा तिघांशी बोलताना सुनित म्हणाला अगं...उद्या गणपती आहेत. अमक्याचा आत्ताच फोन आला म्हणून कळलं. नसता आपल्याला इथे काहीच कळलं नसतं.
यस्स, खरंय इथे काहीच कळत नाही पण मला माहिती आहे उद्या गणपती आहेत म्हणून. But I am happy that we are far away from this. It's good that I am in nature and forgotten about city life and धुमधडाकी फेस्टिवल्स. 

खरंच, खूप छान वाटतंय या इथल्या निसर्गात एखाद्या फुलपाखरासारखं, चिमणीसारखं, घारीसारखं, मासोळीसारखं होत, कुठलंही मानवनिर्मित सामाजिक, सांस्कृतिक अवडंबर माजवलेलं सणावारांच कॅलेंडर घटकाभर विसरून निसर्गातच रममाण होताना. 
I feel I am more wholeheartedly connected to nature and almighty now. 
NATURE, with all its ups and downs, it's seasons, it's cosmic connection and it's relevance also is a great and soulful experience to have. 
To be in nature is itself a blessing.
Nature...the eternal guiding force to humans.

म्हणजे मला सणावारांच कौतुक नाहिये असंही नाही, but forget this recent lockdown phase, पण हल्लीच सणावारांच सार्वजनिक आणि घरगुती स्तरांवरचं   भपकेबाज साजरीकरण बघीतलं की, व्यापारपेठांचे त्या निमित्तानाचे तेल ओतू उद्योग पाहिले की अक्षरशः उबग येतो. त्यात या सोशल मिडियाने सगळ्या जगण्याचाच पोरखेळ करुन टाकलाय. आणि या लॉक डाऊन फेजमधे तर ऊत आलाय सगळ्याचाच. 
म्हणजे शतकानुशतके थापलेल्या शेंदूरामुळे जशी देवाची शिल्पीत मुर्ती तिची मुळ रेखीव रुपरेखा हरवून बसते तसंच काहीसं या व्यापारीकरण आणि सोशल मिडियाच्या संयोगाने आपल्या पारंपरिक सणांचं झालेलं आहे. म्हणजे कालानुरूप सगळ्याच गोष्टी कात टाकतात, पण सद्य परिस्थितीतले हे सण, त्यांच घरोघरचं-सामाजिक साजरीकरण, त्यांच सोशलमिडियावरचं सादरीकरण, खानपानाच्या फोटूपंगती, रंगरंगोटी-झगमगाट अक्षरशः कुणालाही अनाकलनीय वाटावेत इतके अमुलाग्रपणे बदलले आहेत.

हं, तर गंमत म्हणजे यजमानां बरोबर जरी मी गणपती उत्सव विसरल्याची री ओढली असली तरी मी येऊ घातलेला गणेशोत्सव विसरलेली नाहीये. 
हा अहोरात्र अग्निहोत्रासारखा चालणारा सोशल मिडिया विसरुच देत नाही तुम्हाला तुमच्या परंपरा, सण-उत्सव, कर्तव्य, राष्ट्राभिमान सारख्या जगण्याचं पोटमूळ असलेल्या गोष्टींना. सांस्कृतिक जगण्यातली, धार्मिकतेतली, वैयक्तिक उत्सवातील प्रत्येकच गोष्ट सोशल मिडियातून इतकी सातत्याने समोर आली पाहिजे का ? 

महाराष्ट्रातील चकल्या, लाडू, पूरणपोळ्या आणि एवढ्यातल्याच करंज्या आणि मोदकांचा तर कधीपासूनच पाऊस पडतोय या सोशल मिडियांवरनं. 
बापरे !
हाताने बनवलेल्या गणेश मुर्ती-सजावट-मोदक-जेवणा बरोबरच ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या गणेश मूर्ती-सजावटी-मोदकं-जेवणांचे पदार्थ, परत हे सगळं घरच्याघरी करायला शिकवणारे ऑनलाईन क्लासेस, रेडी टू युज, डू इट युवरसेल्फचे पॅकेट्स...
अरे...किती हा बाजारुपणा. अगदी खरंय कोरोना पॅनडेमिकने फार मोठं आव्हान सगळ्यांपूढे उभं केलंय. एकमेकांच्या मदतीने सावरण्याशिवाय पर्याय नाहीये तरी पण इतकाही अतिरेक करायची गरज आहे का ?

मोदक..मोदक...मोदकं. 
अरे किती प्रकारच्या मोदकांच्या रेसिपीज एका व्यक्तीच्या तळहातावर ठेवणार आहात ?
ओल्या-कोरड्या सारणाचे, गुळ-साखरेचे, तळलेले-उकडलेले मोदक, खव्याचे मोदक, ड्रायफ्रुटसचे मोदक, गुलकंदाचे मोदक, खजूराचे मोदक, 
पेढ्यांचे मोदक...मोदक....आणि मोदकंच. 
माझा तर मोबाईल उघडलाकी फक्त मोदक, गणेशमुर्ती, सजावट, आरत्या, येऊ घातलेल्या गौरींची सजावट, कुळाचारी स्वैपाक आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या आठवणींच्या त्याच विषयाला धरुन असलेल्या पोष्टींच एक कतारसे दाखवतोय. 
खरोखर या गणेशोत्सवाच्या निमित्ताने या सोशलमिडियावरनं वरील प्रकारच्या ढगफुटीचा अनुभव मला तरी येतोय बुवा. बरेचदा या झिम्माडीत आपल्याला हवं असलेलं, चांगलही काहीतरी हरवून जात आहे असंही वाटतंय.
कदाचित कुणाला हे खटकेल पण सणावारीच्या खाद्यपदार्थांच्या पोष्टी बघूनच मला अजिर्ण झालंय.

कुणाच्याही श्रध्देविषयी वाद नाही, दुमत नाही. कुठल्या दैवतावर श्रध्दा ठेवावी, त्या दैवताच्या सणाचं सादरीकरण कसं करावं हा ज्याच्या त्याच्या अंतर्मनाचा, कुटुंबातील रीतींचा प्रश्न आहे पण या दैवतांची उपासना करतानाचा हा जो सर्वदूर पोहोचविणारा, सर्वसमावेशक डिजिटल राईट टू पब्लिशचा आविष्कार आहेना त्याला जरा आवरतं घेत गणेशोत्सव वा इतरही सण-उत्सव जरा सबूरीने घ्यावेत असं मला वाटतं. 
एखाद्या दैवताची मनोमन उपासना करण्यासाठी असलेल्या सणांचं रुप देखील नक्कीच काळानूरुप इव्हॉल्व्ह होत असतं. पण म्हणून का त्या आंतरीक बळ देणा-या उपासनेलाच बाजूला हटवून बाकीच्याच गोष्टींचं अवडंबर माजवायचं ?
एवढ्यातल्या या सोशल मिडियाने जळी स्थळी काष्ठी पाषाणी वास असणा-या या ईश्वराला मात्र आपल्या मनमौजीने यत्र, तत्र सर्वत्र करुन या सणाचा व ओघानेच श्रध्देचा भुतो न भविष्यती असा बाजार मांडलाय असं वाटतंय.
🌺

No comments:

Post a Comment